२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९९४ कुटुंबे राहतात. एकूण ४४०३ लोकसंख्येपैकी २१९१ पुरुष तर २२१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.५९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.०२ आहे तर स्त्री साक्षरता ७६.२० आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ४३५ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी,पारसी, ईराणी आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती-बागायती आणि पर्यटन हा व्यवसाय असून चिकू, लिची, तसेच तत्सम फळांच्या बागा आहेत. चिकूची वाईन करण्याचेही काही कारखाने आहेत. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते.